'शेतकरी व शास्त्रज्ञ परीसंवाद" पशु आरोग्य व व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ डॉ. श्री.अमोल हरणे, डॉ. कु.अश्विनी गायधनी, कु. मयुरी ठोंबरे, श्री. तुषार मेश्राम यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. रिलायन्स फाउंडेशन चे सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक श्री. धम्मदीप गोंडाणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रिलायन्स फाऊंडेशनच्या शेतीविषयक कार्याबद्दल मार्गदर्शन केले. म.प.म. वि. वि. चे विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी उपस्थित युवकांना तसेच शेतकरी बांधवांना स्वबळावर तंत्रशुद्ध पद्धतीने पशुधन संवर्धन व दुग्धव्यवसाय करण्याबाबत प्रोत्साहित केले.
तंत्रशुद्ध पद्धतीने पशु संवर्धन करण्याकरिता लागणाऱ्या प्रशिक्षणाची आवश्यकता व प्रशिक्षणाचे महत्त्व उपस्थित युवकांना पटवून दिले. तंत्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण मिळण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची उपयोगिता शेतकरी बांधवांना स्पष्ट केली. कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेऊन महिलांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन तंत्रशुद्ध पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय करावा याबद्दल मार्गदर्शन केले. शेतकरी व शास्त्रज्ञ परिसंवाद कार्यक्रम अंतर्गत उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. परसोडी गावातील 100 लिटर दूग्ध उत्पादक युवा शेतकरी श्री. संदीप कडू आणि श्री. सुधाकर कडू या पिता-पुत्र शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
युवा दुग्ध उत्पादक श्री.वामन चोरघडे, श्री. स्नेहल मोहतकरयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल हरणे यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अश्विनी गायधनी यांनी केले.