गावात पोलिस पाटील कडुन गावाच्या सिमावर चौकशी सुरू

ठाणेदारांचि पोलिस पाटलांच्या दक्षतेला विझिट .

वर्धा / तळेगांव शा.पंत (प्रतिनिधी)



                   देशात सुरू असलेल्या कोरोना वायरस च्या  संचारबंदी ला नागरिकाकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे; परंतु ग्रामीण खेड्यात शेतकरी शेतमजूर असलेल्या शेतकरी शेतात गेल्याशिवाय त्यांच्या कामावर नियमित सुरू असलेल्या शेतीवर संसार अवलंबून आहे परंतु कामासाठी गेला तर जीवाची भीती सुद्धा सर्वाना आहे व पिकांचे सरक्षंण कोन करनार याची सुद्धा शेतकऱ्यांना चिंता आहे,
           
                    परंतु कोरोना वायरस असा विषाणू आहे कि घराच्या बाहेर पडणे खुप महाग पडले असून ग्रामीण खेड्यातील ग्रामपंचायत चे सरपंच सदस्य आपल्या स्तरावर पोलिस पाटील सह मोहीम राबवत असून पोलिस पाटलांनी गावात वारंवार माहिती देवून घराबाहेर पडू नये असे सांगितले असताना सुद्धा ग्रामीण खेड्यात नागरिक स्वतः दक्षता घेत नाही आहे

                    याकरिता पोलिस पाटील यानी स्वतः सरपंच ला घेवून टेबल  खुर्ची गावाच्या सीमेवर बसून गावाकडे लक्ष घालत आहे; अतिशय महत्त्वाचे दवाखाना किराणा मेडिकल असे महत्त्वाच्या ठिकाण जायचे असल्यास परवानगी देत आहे,

                    सरपंच, पोलिस पाटील यांनी सर्व नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी असे आदेशानुसार सांगण्यात आले आहे.

Previous Post Next Post